Posts

Showing posts from August, 2019

अहमदनगर जिल्हा शेतकरी कंपन्यांची हमीभाव बैठक संपन्न

Image
कृषी विद्यापीठ, राहुरी , २८ ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेड पदाधिकाऱ्यांसोबत कांदा विषयाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीचे औचित्य साधून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे PSS खरेदीच्या बाबत चर्चा व नियोजन झाले. 

अकोल्यात मूग व उडिदाची अनुक्रमे १००० मे टन व १५०० मे. टन खरेदी अधिक होणार

Image
तेल्हारा (अकोला) २९ ऑगस्ट : अकोला जिल्ह्यात हमीभाव खरेदीचे नियोजन करण्यासाठी शिवार्पण शेतकरी उत्पादक कंपनी च्या कार्यक्षेत्रावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेऊन कंपनीनिहाय कार्यक्षेत्र निश्चित करून शेतकऱ्यांपर्यंत  अधिक चांगल्या पद्धतीने योजना पोहोचविण्यासाठी नियोज़न करण्यात आले आहे. 

हिंगोलीमध्ये शेतकरी कंपन्यांमार्फत PSS खरेदीला उत्स्फूर्त सहभाग

Image
हिंगोली, २८ ऑगस्ट , शेतकरी कंपन्यांनी  PSS खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी नियोजनाला सुरुवात केली आहे. 

PSS खरेदी साठी प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ : महाएफपीसी

Image
पुणे, २८ ऑगस्ट : शेतकरी कंपन्यांची मागणी लक्षात घेऊन PSS खरेदी साठी कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देत असल्याची माहिती महाएफपीसी द्वारे देण्यात आली आहे.

बुलढाण्यात शेतकरी कंपन्यांचे २८०० मे. टन मूग, २६०० मे . टन उडीद खरेदीचे उद्दिष्ट्य

Image
बुलढाणा , २८ ऑगस्ट : जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांनी महाएफपीसी अंतर्गत PSS  खरेदी करण्यासाठी आढावा बैठक घेतली. यावेळी   २८ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

१५ सप्टेंबर पासून मूग , उडीद व १ ऑक्टोबर पासून सोयाबीन PSS खरेदी नोंदणी सुरु होणार

Image
औरंगाबाद ता. २६ खरीप हंगामात यंदाच्या वर्षी पावसाची परिस्थिती राज्यात कमी अधिक प्रमाणात असल्याने पिकांचे उत्पादन व उत्पादकता यावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तसेच बाजारामधील मंदीचे सावट  लक्षात घेता उत्पादित झालेल्या शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्याची देखील फारशी शाश्वतता नसल्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हमीभाव योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची पर्यायी विक्री देखील उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यक्ता आहे. याच उद्देशाने महाएफपीसी माफ डाळी  व तेलबिया खरेदीसाठी औरंगाबाद येथील शेतकरी कंपन्यांची कंपन्यांची जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात बैठक संपन्न झाली. 

परभणी मध्ये शेतकरी कंपन्यांमार्फत ७५०० क्विंटल मूग व उडीद खरेदीचे उद्दिष्ट्य

Image
बोरी, ता. २५ ऑगस्ट, परभणी जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची पीएसएस खरेदी केंद्रे सुरु करण्यासाठी वर्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, वर्ण ( ता. जिंतूर) येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील १३ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सेलू, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, मानवत, पालम या मूग व उडीद उत्पादक तालुक्यांमध्ये पीक परिस्थिती विचारात घेऊन खरेदी केंद्रे सुरु करण्याबाबत  निर्णय घेण्यात आला  आहे. साधारपणे सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात ७५०० क्विंटल खरेदीची शक्यता आहे. बिगर सभासद शेतकरी उत्पादकांना खरेदी प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी उत्पादक कंपन्यांचे सभासद करून घेण्यासाठी जिल्हास्तरीय अभियान घेण्यात येणार आहे. 

शेतकरी हितासाठी कार्पोरेट क्षेत्राने शेतकरी संस्थांशी भागीदारी करावी :सुभाष देसाई

Image
मुंबई, ता.२३ ऑगस्ट : शेतीच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी कार्पोरेट क्षेत्र व शेतकरी कंपन्या यांची भागीदारी गरजेची असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी इंडियन मर्चंट चेंबर येथे आयोजित चर्चासत्रात केले. उद्योगमंत्रांच्या संकल्पनेतून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी उद्योग व शेतकरी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बीड मधील शेतकरी कंपन्यांचा आदर्शवत हमीभाव खरेदी केंद्रे सुरु करण्याचा संकल्प

Image
बोरखेड ( पाटोदा, बीड )  ता. २४ ऑगस्ट : हमीभाव खरेदी केंद्रे सुरु  करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड  मधील  शेतकरी उत्पादक कंपन्या सज्ज झाल्या असून त्यांनी राज्यात पारदर्शक व शेतकरी केंद्रित हमीभाव खरेदी चा राज्यात आदर्शवत असा ‘बीड पॅटर्न’ निर्माण करण्याचा संकल्प सोडला आहे. येत्या खरीप हंगामामधील हमीभाव खरेदी सुरु होत असल्याने महाएफपीसी मार्फत राज्यभर जिल्हानिहाय नियोजन बैठका सुरु आहेत. बीड जिल्यातील कंपन्यांची बैठक बोरखेड ( ता. पाटोदा  ) येथे नुकतीच पार पडली. यावेळी ७ तालुकयांमधील १७ शेतकरी उत्पादक कंपन्या उपस्थित होत्या.

पीएम- आशा अंतर्गत सोयाबीन हमीभाव पथदर्शी प्रकल्पासाठी शेतकरी कंपन्यांची तयारी सुरु

Image
लातूर, ता. २१ केंद्र शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न अभियान ( पी एम -आशा ) अंतर्गत हमीभाव योजनांची पुर्नरचना केली असून तेलबियांसाठी खाजगी खरेदी व साठवणूक योजनेअंतर्गत (पीपीएसएस)  देशात  ८ पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून  महाएफपीसी मार्फत लातूर  जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांनी देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प   राबविण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. या योजनेची शेतकरी कंपन्यांना माहिती देण्यासाठी लातूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

शेतकरी कंपन्यांमार्फत मूग, उडीद, सोयाबीन हमीभाब खरेदी केंद्रे सुरु होणार : महाएफपीसी

Image
मुंबई : २१ ऑगस्ट हमीभाव खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत खरेदी केंद्रे सुरु होणार आहेत.   राज्य शासनाने महा एफपीसी ला अभिकर्ता    संस्थेचा दर्जा दिल्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांचा हमीभाब खरेदीचा मार्ग खुला झाला आहे. मंत्रालयात पणन सचिवांच्या दालनात नियोजनाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक  पार पडली. यावेळी महाएफपीसी, महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ फेडरेशन चे पदाधिकारी उपस्थित होते. महाएफपीसी  मार्फत यासाठी नियोजन सुरु झाले असून जिल्हानिहाय पूर्वतयारी बैठका सुरु झाल्या आहेत. लातूर येथे पहिली बैठक संपन्न  झाली असून सुमारे ७० ‘कंपन्यांनी खरेदीसाठी तयारी दर्शविली आहे. इच्छुक संस्थांनी महाएफपीसी कार्यालयात ०२०-२४२७२८२७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा

महा ओनियन मार्फत शेतकरी कंपन्यांची पुणे शहरात रिटेल कांदा विक्री

Image
पुणे, ६ ऑगस्ट : महा एफपीसी च्या पुढाकारातून महा ओनियन  उपक्रमाअंतर्गत शेतकरी कंपन्यांनी रिटेल कांदा  विक्री सुरु केली आहे. पहिल्या टप्यात सिंहगड रोड व गुलटेकडी परिसरात किरकोळ विक्रीची दुकाने व किरकोळ विक्रेते यांच्या मार्फत कांदा  विक्री सुरु असून लवकरच पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात थेट ग्राहकांना कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे.