Posts

Showing posts from October, 2019

राज्यात १० लाख टन सोयाबीन हमीभाव खरेदीचा लक्ष्यांक

Image
पुणे : केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी १० लाख टन सोयाबीन खरेदीचा लक्ष्यांक मंजूर केला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठीं जोरदार तयारी केली आहे. राज्यात पावसामुळे सोयाबीन पिकाचे २० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याची परिस्थिती आहे. कमी उत्पादनामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत आहे. मात्र बाजारात बाजारभाव वाढीचा फारसा कल दिसून येत नाही. तरी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व बाजारभावामधील चढ   उताराचा धोका धोका कमी करण्यासाठी  हमीभाव खरेदी केंद्रांवर नोंदणी करावी असे आवाहन महाएफपीसी मार्फत करण्यात येत आहे. 

दीपावली स्नेहमेळाव्यात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांचे नवसंकल्प

Image
जळगाव: ता. २६ जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांनी दीपावलीच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून स्नेहमेळाव्याचे आयोजन  करून  शेतकरी कंपन्यांच्या क्षमता बांधणीचा अनोखा उपक्रम साकारला आहे. यावेळी जिल्ह्यातील १७ शेतकरी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तुषार पाटील , गोकुळ पाटील , निलेश पाटील व  महाएफपीसीचे प्रशांत पवार  यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन   केले होते. 

मूग, उडीद व सोयाबीन खरेदी नोंदणी १५ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार

Image
पुणे: २६, राज्य शासनाने मूग, उडीद व सोयाबीन खरेदी नोंदणी साठी १५ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याने हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे सुलभ होणार आहे. 

मार्च २०२० अखेरीस शेतकरी कंपन्यांद्वारे २५ हजार टनाचे कांदा स्टोअरेज ग्रीड उभारणार : संजीवकुमार चड्ढा

Image
पुणे : १९ ऑक्टोबर, राज्य सरकारने नाफेड -महाएफपीसी व शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा संयुक्त भागीदारी असणारा २४ कोटी रुपयांच्या कांदा साठवणूक व पणन प्रकल्पास मंजुरी दिली आहे. यामध्ये राज्य शासन ५० टक्के गुंतवणूक करत असून शेतकरी कंपन्या व नाफेड उर्वरित गुंतवणूक करत आहेत. सदर प्रकल्पाच्या द्वारे देशात कांद्याची बफर  साठा साठवणूक करण्यासाठी पायाभूत सुविधा उभी राहणार आहे. तसेच शेतकरी कंपन्यांना व्यावसायिक संधी मिळणार आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान पुणे येथे नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार चड्ढा यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत झालेल्या कांदा खरेदीचा आढावा घेण्यात आला. कांदा साठवणुकीमधील नुकसान टाळण्यासाठी या स्टोअरेज ग्रीडचा मोठा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सदर प्रकल्पात पहिल्या टप्यात ७ कंपन्यांचे करार झाले असून उर्वरित कंपन्यांची निवडप्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्यात येणार आहे. तसेच भारतीय कृषी अनुसंधान  परिषदेने या प्रकल्पात तांत्रिक सल्लगार म्हणून काम करण्यास तत्वतः मंजुरी दिल्याने राष्ट्रीय कांदा, लसूण स...

महाएफपीसी मार्फत हमीभाव खरेदीचे चुकारे तीन दिवसांत शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात.

Image
पुणे : १८ ऑक्टोबर, शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत सुरु केलेल्या खरेदी केंद्रांवर मुगाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यास सुरुवात केली आहे. साधारपणे खरेदी केलेला शेतमाल गोदामांमध्ये गेल्यापासून साधारणपणे ३ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांचे पेमेंट थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करताना आपल्या बँक खात्याची बिनचूक माहिती खरेदी केंद्रांवर जमा करावी असे शेतकऱ्यांना आव्हान करण्यात महाएफपीसी मार्फत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वेळेत पेमेंट करण्यासाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने या कामी सुसुत्रता आली आहे.  हमीभाव खरेदीचे उशिरा चुकारे होण्याच्या कारणास्तव या योजनेस शेतकरी म्हणावा असा प्रतिसाद देत नाहीत. असा शेतकऱ्यांचा समज होता परंतु यंदा मात्र अशी वस्तुस्तिथी नाही हे सिद्ध झाले आहे  त्यामुळे शेतकऱ्यांनी  या वर्षी हमीभाव खरेदीसाठी नोंदणी करून बाजारभावापेक्षा शेतमालाचे दर कमी असल्यास हमीभाव खरेदी क...

शेतकरी कंपन्यांच्या १०,००० सभासदांची मूग, उडीद, सोयाबीन हमीभाव खरेदी साठी नोंदणी

Image
पुणे ता. १३, राज्यात  उत्पादक कंपन्यांमार्फत १७  जिल्ह्यांमधील १०५ शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केली असून पहिल्या टप्यात  मूग,उडीद व सोयाबीन या पिकांच्या हमीभावाने विक्रीसाठी १०,००० सभासद शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून प्रत्यक्ष खरेदीला देखील सुरुवात केली आहे. लातूर जिल्ह्यातील कंपन्यांनी  नोंदणी प्रक्रियेत  आघाडी घेतली असून २३१३ शेतकरी नोंदणीकृत झाले आहेत. त्यापाठोपाठ हिंगोली (१४००), बीड (११२४), परभणी ( १०५२) या जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची नियोजनबद्धरित्या प्रचार व प्रसिद्धी केली असून शेतकऱ्यांनी देखील नोंदणीला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यातुलनेत अमरावती, वाशीम व जळगाव जिल्ह्यात मात्र शेतकरी कंपन्यांकडून समाधानकारक कामगिरी होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच बाजारात सोयाबीनचे दर घसरत चालल्याने आणि सोयाबीन नोंदणीची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असल्याने पुढील आठवड्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करतील व वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी  शेतकऱ्यांनी लवकरात  कंपन्...