शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत लातूर, उस्मानाबाद येथे सोयाबीन खरेदी सुरु


लातूर ,ता. १७ : महाएफपीसी च्या माध्यमातून प्रोडक्टिव्ह अलायन्स  (Productive  Alliance ) चा प्रयोग राबवत शेतकरी उत्पादक कंपन्या व प्रक्रियादार यांच्यात समन्वय साधून शेतमालाची खरेदी व विक्री सुरू झाली आहे. सोयाबीन प्रक्रियेमध्ये अग्रेसर असणाऱ्या एडीएम कंपनीने शेतकरी उत्पादक कंपन्यांना सोयाबीन पुरवठा करण्यासाठी संधी दिली आहे. 

उस्मानाबाद मधील अजिंक्य ऍग्रो , एन एन जी ऍग्रो , अभिनव विकसित तर लातूर मधील  एस. पी. कृषी मित्र या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी साधारणपणे ४५ मे . टन  सोयाबीन चे सौदे केले आहेत.  

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या या खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांचा वाहतूक व  इतर  खर्च कमी होणार आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या केंद्रांचा फायदा घ्यावा. असे आवाहन कंपन्यांच्या   वतीने करण्यात येत आहे. 

Comments

Popular posts from this blog

लातूरमधील कंपन्याचे डिसें. अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य.

MAHAFPC successfully bids for country’s first Reverse e-auction of Onion through MSTC

महा ओनियन मार्फत शेतकरी कंपन्यांची पुणे शहरात रिटेल कांदा विक्री