शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत लातूर, उस्मानाबाद येथे सोयाबीन खरेदी सुरु

लातूर , ता. १७ : महाएफपीसी च्या माध्यमातून प्रोडक्टिव्ह अलायन्स (Productive Alliance ) चा प्रयोग राबवत शेतकरी उत्पादक कंपन्या व प्रक्रियादार यांच्यात समन्वय साधून शेतमालाची खरेदी व विक्री सुरू झाली आहे. सोयाबीन प्रक्रियेमध्ये अग्रेसर असणाऱ्या एडीएम कंपनीने शेतकरी उत्पादक कंपन्यांना सोयाबीन पुरवठा करण्यासाठी संधी दिली आहे. उस्मानाबाद मधील अजिंक्य ऍग्रो , एन एन जी ऍग्रो , अभिनव विकसित तर लातूर मधील एस. पी. कृषी मित्र या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी साधारणपणे ४५ मे . टन सोयाबीन चे सौदे केले आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या या खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांचा वाहतूक व इतर खर्च कमी होणार आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या केंद्रांचा फायदा घ्यावा. असे आवाहन कंपन्यांच्या वतीने करण्यात येत आहे.